"हरिहरगड
गिर्यारोहकांसाठी प्रसिद्ध
आहे तो म्हणजे 'सरळ
उभ्या'
व
'बोगदयामधुन
जाणाऱ्या'
कातळ
कोरीव चित्तथरारक पायऱ्यासासांठी."
कितेक
दिवसापासुन हरिहरगड पहायची
खुप ईच्छा होती पण नियोजण होत
नव्हते,
एक
दिवस अरूण गवेकर यांचा संदेश
आला "जाणता
राजा ट्रेकर्स"
आयोजित
हरिहरगड रविवार दि.
07/01/2018 ला
आहे,
लगेचच
मि अजितला फोन केला,
तो
म्हणाला पप्पा व मि जाणारा
आहे आणि तु पण येत आहेस,
अजितने
माझे येणे त्याच्यासाठी
निश्चित केले,
मला
मात्र प्रश्न पडला ट्रेकचे
नियोजन ठाणेहून आहे ?
मला
ठाणे पुण्याहून गाठायचे आहे
?
ट्रेकला
जायचे तर आहेच,
मग
कसे ?
मग
मी ठरवले व शुक्रवारी रात्रीच
अजितकडे मुंबईला गेलो व तेथून
आम्ही शनिवारी रात्री १२:००
वाजता ठाणे येथुन नियोजणा
प्रमाणे निघालो.
रविवार
दि.
०७/०१/२०१८
पहाटे ०४:३०
वाजता आम्ही "आद्य
ज्योतिर्लिंग श्री त्रंबकेश्वर" येथे
पोहचलो,
तेथेच
थोडे आवरून त्रंबकेश्वरचे
दर्शन घेतले व नाश्ता उरकुन "हर्षेवाडी" गाठली,
सकाळचे
०८:३०
वाजले होते,
तेथेच
एकमेकांचा परिचय सत्र झाले,
तज्ञ
सदस्यांनी गडाचा परिचय व ट्रेक
मधील खाच खळग्यांची माहिती
दिली.
१.३०
तासाचा चढाई नंतर आम्ही १०:३०
वाजता पायऱ्यांपाशी पोहचलो,
सरळ
व तीव्र चढाईच्या या पायऱ्या
बांधलेल्या जिन्यासारख्या
वाटतात,
तशा
या चढाईसाठी अवघड आहेत पण
जागोजागी आधारासाठी खोबण्या
केलेल्या आहेत त्याचा सहाय्याने
आम्ही पार केल्या,
पायऱ्यांचा
शेवटी बांधलेला मुख्यदरवाजा
अजूनही सुस्थितीत आहे,
तेथेच
एका दगडामध्ये कोरलेला लहानसा
पण सुंदर सुबक असा गणपती आहे,
त्याला
नमस्कार करून आम्ही पुढे कातळ
कोरून तयार केलेला रस्ता,
याच्या
एकबाजूला कातळ तर दुसऱ्या
बाजूला आहे खोल दरी.
तसेच
पुढे गेल्यावर पायऱ्यानिशी
असलेला बोगदा व पुढील दोन
दरवाजे असा हा पुर्ण अदभुत
मार्ग सावधगिरीनेच पार करून
गडावरती पोहचलो.
"इतिहास
असे सांगतो,
कॅप्टन
ब्रिग्ज हा इग्रंज अधिकारी
या पायऱ्या नष्ट करायला आला
होता पण तो या पायऱ्या पाहताच
त्यांचा मोहात पडला व तसाच
माघारी परतला,
ज्यांनी
हे निर्माण केले आहे त्याचे
कौतुक करावे तितके कमीच,
या
मार्गाचे वर्णन शब्दात
करणं कठिणच."
गडावरती
पाहायला पडझड झालेल्या वास्तू,
गुप्त
दरवाजा,
पाण्याची
टाके,
पावसाळी
तलाव,
नंदी
,
शिवलिंग,
हनुमान
मंदिर,
कोठार
व गडाची सर्वोच माथ्याची टेकडी
आहे,
हे
सर्व गडावरती पाहून झाल्यानंतर
आम्ही तलावाकाठी झाडाच्या
सावलीमध्ये सर्वानी आणलेले
डबे एकत्र बसून खाले व परत
तितक्याच काळजीपूर्वक गड
उतरण्यास सुरुवात केली.
निम्म्यात
आल्यावर पठारावरती हर्षेवाडीच्या
बाजूस एक आश्रम,
दगडी
बांधलेला कुंड (तलाव),
कुंडाचा
भिंतीवरती कोरलेला शिलालेख
व गणपती आहे ते पाहुन तेथून
थोडेसे जंगलामध्ये पुढे जाताच
तेथे हनुमानाचे मंदिर आहे व
मंदिराचा समोर दगडामध्ये शिव
शंकराची प्रतिमा कोरलेली आहे
हे सर्व पाहून दुपारचे २:३०
वाजता आम्ही हर्षेवाडी येथे
पोहचलो व लगेचच मुंबईचा दिशेने
निघालो व रात्री ०८:००
वाजता ठाणे येथे पोहचलो.
अशाप्रकारे
या वर्षीच्या ट्रेक चा श्रीगणेशा
झाला.
"इतिहासाची
साक्ष देत असलेला हा गड पहायला
व अनुभवायला मिळाला,
हे
आमचे भाग्यच!!!"
©सुशील राजगोळकर