महाराष्ट्र, सह्यांद्री, दुर्ग, गड, किल्ले, महाराष्ट्रातील किल्ले, प्रवास, निसर्ग, भटकंती, छायाचित्र, लेणी, प्राचिन मंदिरे, पुरातन मंदिरे, समुद्र किनारे, शोध, धाडस, मंदिरे, Maharashtra, Trek, Trekking, Trekker, Nature Lover, Traveler, Photography, Fort, Fort in Maharashtra, Sahyadri Mountain, Old Temples, Caves, Adventure, Explorer, Trails.
कळसुबाई शिखर KALSUBAI PEAK
दि.
१६/१२/२०१७ला
रात्री ८.००
वाजता पुणे येथून निघालो.
रात्री १०.००
वाजता खेड घाटाजवळ हाँटेल
मध्ये जेवण ऊरकुन निघालो.
त्यानंतर थेट
गाडी थांबली ति म्हणजे "बारी"
या गाविच,
तेव्हा पहाटेचे
३.००
वाजले होते. कडाक्याची
थंडी वाजत होती.
अंधारात काही
दिसत नसल्यामुळे सर्वांनी
हातात विजेरी घेतली.
मस्तपैकी
गरमागरम पोहे व चहा घेतला.
तिथल्याच
मंदिराच्या अंगणात एकमेकांचा
परिचय सत्र झाले व ३.४५
ला महाराष्ट्र मधील सर्वोच्च
शिखर"कळसुबाई"
चढायला सुरवात
केली.
अंधाऱ्या
रात्री आकाशातल्या चांदण्या
खूपच मनमोहक दिसत होत्या.
मध्येेच अंगावर
येणाऱ्या थंड वाऱ्यामूळे
अंगावर सरसरून काटा येत होता.
सुर्योदयापूर्वीच
माथ्यावर पोहचायचे असल्यामुळे
लगबगीने चालायला सुरू केले.
प्रचंड प्रमाणात
येणाऱ्या गिर्यारोहकांमुळे
पायवाट चांगलीच मळलेली आहे.
मध्ये मध्ये
दगडी पायरी आहेत व लोखंडी शिडी
बसवलेल्या आहेत तब्बल २.३०
तासाच्या चढाई नंतर आम्ही
सुमारे ६.३०
वाजता माथा गाठला. सर्वप्रथम
कळसुबाई मातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर
सुर्यदेवतेच्या आगमनाची
आतुरतेने वाट पाहू लागलो.
कळसूबाई वरून
दिसणारा तो सूर्योदय अप्रतिम
होता. माथ्यावर
वाहणाऱ्या सोसाट्याच्या
वाऱ्यामुळे थंडी तर खूपच वाजत
होती पण फोटो पण काढायची हौस
होती. मग
काय....... थोडा
वेळ फोटो काढायचे आणि मध्येच
थंडी पासुन वाचण्या साठी
मंदिराचा मागे लपत होते. शिखरा
वरून दिसनारे नयनरम्य दृश्य
नजरेत भरून घेतले आणि ८.३०
ला शिखर ऊतरायला सुरवात
केली.आजूबाजूला
दिसणारा परिसर पाहत खाली
ऊतरलो. मागे
वळुन पाहताच लक्षात आले अंधारा
मध्ये आपन किती चढाई केली
होती. ११.३०
ला खाली पोहचलो, जेवण
केले आणि परतीच्या मार्गाला
लागलो. अशाप्रकारे
महाराष्ट्रातील सर्वात ऊंच
कळसुबाई शिखराचा ट्रेक
अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
©सुशील राजगोळकर
देवकुंड धबधबा - भिरा पाटणुस रायगड महाराष्ट्र Devkund Waterfall - Bhira Patnus Raigad Maharashtra
08 नोव्हेंबर 2017 ला सकाळी 8:00 वाजता देवकुंडला
जायला निघालो, आनंद बिराजदार ला घेऊन 8:30 ला निघालो. "थंडी आणि दुचाकी हे समीकरण
लक्षात घेऊन थोड्या उशिराच निघायचे" हा निर्णय तसा ठीकच वाटला. ताम्हिणी घाटामध्ये पुणे रायगड हद्दीवर
पोटभर नाष्टा केला. दुपारी 12:30 ला भिरा येथे पोहोचलो. दुपारी 1:00 ला ट्रेक सुरू केला, भिरा धरणाच्या बाजुने जंगलातुन आम्ही चालु लागलो,
चालतांना मध्ये मध्ये पक्ष्यांचे प्राण्यांचे निरनिराळे आवाज तर मध्ये मध्ये खळखळत
जाणारा पाण्याचा आवाज ऐकु येत होता. साधारणपणे
दीड तासाच्या वाटचालीनंतर देवकुंड ला पोहचलो, उंची वरुन पडणारा धबधबा व तेथिल थंड व नितळ स्वच्छ पाणी
पाहुन मनभरून गेले, न राहुन पाण्यात डुबकी मारली पोहुन झाल्या नंतर आनंदने आणलेला डबा
पाण्यात पाय ठेऊन निवांतपणे खाल्ला, बुधवार असल्याने तशि गर्दि कमिच होती तेथुन सर्व
पर्यटक परतिच्या वाटेला निघायला लागले, आम्ही मात्र तेथुन सर्व पर्यटक गेल्या नंतर
निरव शांतते मध्ये थोडावेळ थांबून छायाचित्रे घेतली आणि परतिच्या वाटेला लागलो.
©सुशील राजगोळकर
पन्हाळगड ते पावनखिंड 15 व 16 जुलै 2017, Panhalgad To Pawankhind
ठरल्याप्रमाणे
माझा भाचा अजित गवेकर मुंबईहुन
शुक्रवारी 14
जुलै
रोजी चिंचवडला 7:00
वाजता
माझ्याकडे आला,
येथुन
आम्ही दोघे बालाजीनगरला शैलेश
चिंदके कडे जेवायला गेलो.
त्याने
खास कोल्हापुरी आख्खा मसुर
जेवणाचा बेत केला होता,
जेवन
ऊरकुन आम्ही तिघे कात्रजला
गेलो.
एव्हाना
रात्रीचे 12:30
वाजले
होते,
तेथे
सागर थोरात आमची वाट पाहत
होता.
येथुन
आम्ही चौघे कोल्हापुरला जाणारी
बस पकडुन निघालो,
पहाटे
5:30
वाजता
कोल्हापुरला पोहचलो.
तेथेच
फ्रेश होऊन 7:15
ची
पन्हाळा गाडी पकडुन गडावरती
पोहचलो.
पन्हाळगडावरती
पोहताच वीर शिवा काशीद व वीर
बाजीप्रभु देशपांडे यांच्या
पुतळ्याला वंदन करून तीन
दरवाजा येथे आलो,
तेथे
आमचा मित्र धर्मदास मोटे आला
होता.
त्याच्यासोबत
नाश्ता ऊरकुन आम्ही पाच जण
राजदिंडी दरवाजाकडे निघालो,
भग्न
अवस्थेतील दरवाजा पाहुन मन
खिन्न झाले.
याच
दरवाजा मधुन महाराज विशाळगडाकडे
गेले होते.
तेथुनच
आम्ही आमच्या ट्रेकची सुरवात
केली.
येथुनच
जंगलातुन वाट जाते,
त्याच
वाटेने आम्ही निघालो,
थोडे
चालत जाताच मसाई पठारावरती
पोहचलो,
तेथे
फोटो काढुन पुढे चालत राहीलो,
थोडे
अंतर पुढे गेल्यानंतर पठारावरती
मसाई देवीचे मंदिर लागले,
तेथे
नमस्कार करुन थोडे आडवाटेला
गेलो व तेथे पांडवदरा व बुधा
लेणी पाहिल्या व तेथेच दुपारचे
जेवन ऊरकले व पुढे पठारावरती
चालू लागलो.
त्यातच
जोराचा वारा व पाऊस चालू झाला,
पाऊसाचा
मार झेलत भिजत चालत राहीलो व
5
ते
6
कि.मि.
चा
पठार संपवून पुढे डोंगर रांगेतुन
चालायला लागलो,
डोंगराच्या
कुशीत वसलेल्या लहान लहान
वाड्या-वस्तीमधुन
चालत होतो,
त्या
वाड्या पाहून वाटते अजुनही
त्या वाड्यांना शहराची झळ
लागलेली नाही,
असेच
डोंगर रांगेने पुढे जात 20
ते
25
कि.
मि.
ट्रेक
करून करपेवाडी या गावी आम्ही
एका घरामध्ये रात्रीचा मुक्काम
केला.
दुसऱ्या
दिवशी (16
जुलै
2017
) सकाळी
नाश्ता ऊरकुन आम्ही 08:00
वाजता
निघालो,
घनदाट
जंगलातुन जाताना झाडांच्या
अधुन मधुन डोकावणारी सकाळची
कोवळी सूर्य किरणे पाहत,
पक्षांचे
येणारे वेगवेगळे आवाज ऐकत,
जंगलातुन
जाताना दिसनारे फेसाळत पडणारे
धबधबे व त्याचा आवाज तसेच
बरेचसे लहान मोठे ओढे पार करत,
वेगवेगळ्या
प्रकारची झाडे पाहत आम्ही
चालत राहीलो.
त्यातच
पाऊस येत-जात
होता,
जंगलातील
चिखलमय रस्ता तुडवत मध्येच
निसरडा रस्ता कापत आम्ही 45
ते
50
कि.
मि.
चा
ट्रेक करून पावनखिंडपाशी
नवीन बांधलेल्या ध्वजस्तंभापाशी
पोहचलो,
त्या
ऊंच स्तंभावरून पावनखिंड व
निसर्गरम्य असे वातावरण पाहून
आम्ही 05:00
वाजता
तयार केलेल्या लोखंडी शिडीवरून
पावनखिंड मध्ये उतरलो,
खिंड
पाहून झाल्यानंतर दोन दिवसाचा
ट्रेकचा थकवा दुर झाला व बरे
वाटले.
त्यानंतर
आम्ही भाततळी या गावी गेलो व
तेथुन कोल्हापुर गाडी पकडुन
कोल्हापुर गाठले व लागोलग
पुणे गाडी पकडुन पुण्याला
परत आलो.
©सुशील राजगोळकर
कात्रज (जुना बोगदा) ते सिंहगड म्हणजेच K2S, Katraj To Sinhagad
पुण्यातील
प्रसिद्ध आणि ट्रेकर्स चा
आवडता ट्रेक म्हणूनच ह्या
सीजन चा पहिला आणि वॉर्मउप
ट्रेक म्हणुन हा ट्रेक निश्चित
केला.
आणि
ठरल्या प्रमाणे 17/06/2017
सकाळी
8:30
वाजता
टनेल जवळील वाघजाई देवीच्या
दर्शनाने ट्रेकला सुरवात
केली.तसा
हा मध्यम अवघड (moderate
difficulty) आणि
जास्त दम सहनशक्ती (high
endurance) चा
आवश्यकता असणारा ट्रेक.
एकूण
17
डोंगर
आणि 20
किमी
आणि आम्ही 8
जण,
दोन
तीन नवीन मित्र नवखे
ट्रेकर्स,
काही
मध्यम आणि दोन तीन अनुभवी
ट्रेकर्स सजले पूर्ण तयारीनिशी
होतो.
पहिले
2
डोंगर
झाले आणि ऊन वाढलं आणि ट्रेक
ची अवघड पण जाणवू लागला.सगळ्यांचीच
कसोटी लागु लागली दर 40
ते
45
मिनिटाने
थांबा घेत होतो.
मध्यंतरी
अजून एक ग्रुप मधी भेटत होता,
दुपारी
जेवण झालं आणि मग सगळे निघाले
काही थोडे पुढे काही थांबत
बसत मागून हळू हळू येत होते.
एक
एक डोंगर सरत होता आणि सिंहगड
अजून अजून जवळ दिसत होता आणि
मधील डोंगर आणि दऱ्या कमी होत
होत्या आणि पुढच्या ग्रुपने
2:30
ला
सिंहगड पायथा गाठला दुसऱ्या
ग्रुपने लगोलग 3:15
ला
ट्रेक पूर्ण केला.
सिंहगडावर
पोहचल्यावर सगळ्यांनीच दिवसभर
म्हणून दाखवलेली इच्छा अखेरीस
पूर्ण झाली आणि मुसळधार पाऊस
झाला सर्व ग्रुपने पावसाचा भजी आणि चहा बरोबर भिजून
मनमुराद आनंद लुटला.
संध्याकाळी
6:00
च्या
सुमारास पीएमटी च्या बस ने
बरोबरच सर्वजण पुण्याकडे
रवाना झालो.
अश्या प्रकारे सर्व मित्रांनी सीजन च्या पहिला ट्रेक *कात्रज ते सिंहगड* चा मनसोक्त आनंद घेतला
# Awesome Trek with Expert Anand Birajdar.
# Trek start on early morning from old tunnel at 8:30am and Successfully end on Sinhgad at 3:15pm.
# No थकवा only feeling Refresh.
# हा Trek नाही Treks आहेत.
# सुरवातीली असे वाटले आपन Out होतो की काय, नंतर set zalya नंतर असे वाटु लागले, आज आपन Century करायचिच, मध्येच ऐकटा बोलला Nurous 90 नाही झालि पाहिजे, पण सर्व membersनि, Not Out Century केलि.
# काही Members चि Life मधील पहीलीच Test Match होती.
# कात्रज ते सिंहगड फक्त ऐकुनच होतो, काल ट्रेक Successfully करुण झाला, शेवटी ट्रेक संपल्या नंतर प्रतेकाच्या चेहरा वरिल आनंद व विश्वास पाहुन मला खुप बरे वाटले.
©सुशील राजगोळकर
Subscribe to:
Posts (Atom)
सातारा भाग ३/३ : कास पठार । यवतेश्वर । एकीव धबधबा । सज्जनगड । केदारनाथ - परळी । Kas Pathar । Yavateshwar । Ekiv । Sajjangad | Kedarnath - Parali ⛰️ 🛕
दिवस तिसरा, सोमवार १६-सप्टेंबर-२०२४ यवतेश्वर मंदिर । Yavateshwar Temple 🛕 पहाटे आवरून प्रथम कास पठार कडे निघालो घाटामध्ये गाडी थांबवली व धु...
-
AMK म्हणजे अलंगगड - मदनगड - कुलंगगड सह्यांद्री मधील चढाईसाठी खूप अवघड व मोठे म्हणून प्रसिद्ध असलेला किल्ला पैकी एक . हे ०३ ...
-
आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...
-
१४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असे ०४ दिवस सुट्टी होती. त्यामुळे सातारा विभागातील गड किल्ले व इतर भटकंतीला जायचे असे ठरवून अजित व मी वेळ मिळेल ...
Note :
भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.