महाराष्ट्र, सह्यांद्री, दुर्ग, गड, किल्ले, महाराष्ट्रातील किल्ले, प्रवास, निसर्ग, भटकंती, छायाचित्र, लेणी, प्राचिन मंदिरे, पुरातन मंदिरे, समुद्र किनारे, शोध, धाडस, मंदिरे, Maharashtra, Trek, Trekking, Trekker, Nature Lover, Traveler, Photography, Fort, Fort in Maharashtra, Sahyadri Mountain, Old Temples, Caves, Adventure, Explorer, Trails.
कळसुबाई शिखर KALSUBAI PEAK
दि.
१६/१२/२०१७ला
रात्री ८.००
वाजता पुणे येथून निघालो.
रात्री १०.००
वाजता खेड घाटाजवळ हाँटेल
मध्ये जेवण ऊरकुन निघालो.
त्यानंतर थेट
गाडी थांबली ति म्हणजे "बारी"
या गाविच,
तेव्हा पहाटेचे
३.००
वाजले होते. कडाक्याची
थंडी वाजत होती.
अंधारात काही
दिसत नसल्यामुळे सर्वांनी
हातात विजेरी घेतली.
मस्तपैकी
गरमागरम पोहे व चहा घेतला.
तिथल्याच
मंदिराच्या अंगणात एकमेकांचा
परिचय सत्र झाले व ३.४५
ला महाराष्ट्र मधील सर्वोच्च
शिखर"कळसुबाई"
चढायला सुरवात
केली.
अंधाऱ्या
रात्री आकाशातल्या चांदण्या
खूपच मनमोहक दिसत होत्या.
मध्येेच अंगावर
येणाऱ्या थंड वाऱ्यामूळे
अंगावर सरसरून काटा येत होता.
सुर्योदयापूर्वीच
माथ्यावर पोहचायचे असल्यामुळे
लगबगीने चालायला सुरू केले.
प्रचंड प्रमाणात
येणाऱ्या गिर्यारोहकांमुळे
पायवाट चांगलीच मळलेली आहे.
मध्ये मध्ये
दगडी पायरी आहेत व लोखंडी शिडी
बसवलेल्या आहेत तब्बल २.३०
तासाच्या चढाई नंतर आम्ही
सुमारे ६.३०
वाजता माथा गाठला. सर्वप्रथम
कळसुबाई मातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर
सुर्यदेवतेच्या आगमनाची
आतुरतेने वाट पाहू लागलो.
कळसूबाई वरून
दिसणारा तो सूर्योदय अप्रतिम
होता. माथ्यावर
वाहणाऱ्या सोसाट्याच्या
वाऱ्यामुळे थंडी तर खूपच वाजत
होती पण फोटो पण काढायची हौस
होती. मग
काय....... थोडा
वेळ फोटो काढायचे आणि मध्येच
थंडी पासुन वाचण्या साठी
मंदिराचा मागे लपत होते. शिखरा
वरून दिसनारे नयनरम्य दृश्य
नजरेत भरून घेतले आणि ८.३०
ला शिखर ऊतरायला सुरवात
केली.आजूबाजूला
दिसणारा परिसर पाहत खाली
ऊतरलो. मागे
वळुन पाहताच लक्षात आले अंधारा
मध्ये आपन किती चढाई केली
होती. ११.३०
ला खाली पोहचलो, जेवण
केले आणि परतीच्या मार्गाला
लागलो. अशाप्रकारे
महाराष्ट्रातील सर्वात ऊंच
कळसुबाई शिखराचा ट्रेक
अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
©सुशील राजगोळकर
Subscribe to:
Comments (Atom)
"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026
मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...
-
हम्पी हे एक भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे . हम्पीचे अवशेष हे युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे . ख...
-
१४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असे ०४ दिवस सुट्टी होती. त्यामुळे सातारा विभागातील गड किल्ले व इतर भटकंतीला जायचे असे ठरवून अजित व मी वेळ मिळेल ...
-
दिवस दुसरा, रविवार १५-सप्टेंबर-२०२४ भूषणगड । Bhushangad पहाटे लवकर उठून आवरले व मसूर येथून रायगाव, वडगांव, रहाटणी, शेणवडी मार्गे भूषणगड कडे ...
Note :
भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.

